Saturday, April 16, 2011

एखादे दिवस आपण कधी असं करायचं, की...

एखादे दिवस आपण कधी असं करायचं,
बाहेर जाऊन येतो म्हणून घरी सांगायचं,
तू माझ्या, मी तुझ्या गाडीवर बसायचं
आणि अख्खं शहर पालथं घालून पडायचं.

पिझ्झा खाण्यापुरते पैसे नसले तरी चालेल,
पण डॉमिनो'झ मध्ये तरीही जाऊन बसायचं,
कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन गाव मांडायचं
आणि एक चोकोलावा केक अर्ध अर्ध खायचं.

एवढे दिवस जे नाही बोललो ते सर्व बोलायचं,
आधी कोण सांगणार यावर भांडण करायचं,
मग एकेकाने निवांतपणे मन मोकळ करायचं
अन जे काही मनात आहे ते सर्वच सांगायचं,

एखाद गोष्ट मला नसेल पटणार तरी चालेल,
पण तू मनात काहीच लपवून नाही ठेवायचं,
स्वतःच गुपितही तू स्वतःच उघडं करायचं
आणि हे लक्षात ठेऊन मी ही तसंच वागायचं.

अस केल तरच हे मैत्रीच नातं आणखी मजबूत व्हायचं,
५% किंवा २५% जीवालागापासून नसतं ग लपवायचं,
दोघांनी एकमेकांशी सर्वच काही शेअर असतं करायचं
माझ्या मते कदाचित यालाच मैत्रीच घट्ट नातं म्हणायचं.

3 comments:

  1. hhhhmmm kharach asa pan kadhitari karaych asat....
    swatah jawalch sagal samorhyala sagun takaycha asat ....
    pan nantar asa watat .....
    kashala........
    swatahch gupit swatah jawal theun baghana....
    aapal sudhha ek sundar jag nirman karun baghana..

    ReplyDelete
  2. hmmm.....
    nice composition tai....

    bt seems dat u r nt in line wid da poem....

    ReplyDelete
  3. kavita chan ahe.
    As sagla nehmi bolatach nast rahaych.
    Kadhi tari na bolta apn as karaych pan ast.
    Nahi zala sanvad kadhi tari shantatetch bolun ghyaych ast.
    pan ayushya agdi mansokt jagaych ast

    ReplyDelete