आजकाल बरेच जण मला विचारत असतात
काय रे तू बरेच दिवस झाले काही लिहिलं नाही?
कसं सांगू त्यांना कि मला काही सुचलं नाही
कारण काही सुचायला तुला एवढ्यात पहिलं नाही.
मला जे काही सुचतं ते तुला बघूनच सुचतं
न पाहीले तुला की काही चुकल्यासारखं वाटतं
म्हणायला तसा जगात असतो मी रोजच्या रोज
पण श्वास घेऊनही काहीतरी मुकल्यासारखं वाटतं .
मग कल्पनेत ठेऊन तुला, मन मी माझे रितं करतो.
डोळे मिटून आठवणीत तुझ्या एकटाच स्मित करतो.
भावना येतात मनात साचून विचार तुझा करताच.
त्यांनाच मग जरासं जुळवून त्यांचे मी गीत करतो.
मी कविता का करतो हे माझं मलाच कळत नाही.
पण तुझ्याशिवाय साधं यमक सुद्धा जुळत नाही.
प्रत्यक्षात तर आता तुला कधी भेटू शकणार नाही.
म्हणून माझ्या कवितेतच तुला बघतो, असंच काही.
--वैभव.