Tuesday, December 4, 2012

पहिलं पहिलं प्रेमपत्र...


                त्याचं प्रेमपत्र...                                                                तिचं प्रेमपत्र...

काही सांगायचंय तुला, एकदा वाचून घेशील..                                 तू लिहिलेलं पत्र मिळालं मला तुझं काल.
नाही पटलं तुला तर फक्त पत्र फाडून देशील.                                 अन सोबत पाठवलेलं गुलाबच फुल लाल.

कधी बोललो नाही कारण धाडसंच झालं नाही,                                ए मला नव्हतं माहिती तू कविता करतोस ते.
अन धाडस झालं, तेव्हा प्रसंगच आला नाही.                                 अन कवितांमधून मुलींची मन चोरतोस ते.

आज अचानक वाटलं आज नाही तर कधी नाही..                             पत्र वाचून आधी थोडं घाबरल्यासारखं वाटलं.
एकदा सांगावंच सारं आता कसलीही भीती नाही.                             म्हंटलं यांनी कदाचित माझं मन तर नाही वाचलं.

तुला पहिल्यांदा पाहताच हे असं सारं घडलं होतं,                             पण मला आवडली तुझी कविता, छान होती फार. 
बघता क्षणीच मला तुझ्यावर प्रेम जडलं होतं...                              रमीनं पण वाचली, ती तर दिवानीच झाली तुझी पार. 

प्रेमात नक्की काय करावं हे तर माहिती नाही मला,                          ती तर म्हणे, आत्ता फोन कर, याला सर्व सांगून टाक.
पण स्वतः हूनही जास्त प्रेम करील अशी खात्री देतो तुला.                   मी म्हंटलं मी कशाला, त्यालाच करू दे ना सुरुवात.

आणखी काही सुचत नाहीये, जास्त लिहित नाही मी.                        अन काय रे, कोपरा कसा देणार, तू कसा सामावशील?
कारण या आधी कधी कुणाला पत्रही लिहिलं नाही मी.                        इथं तर साम्राज्यच तुझं आहे, जागा कशी गमावशील?

नाहीच पटलं तुला तर फक्त हे पत्र फाडून देशील.                             पण तरी, मी मात्र कधी बोलणार नाही, मी गप्प राहील.
मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक आठवण तेवढी ठेवशील.                  तूच बोलावं वाटतं मला, तोवर वाटल्यास मी वाट पाहिलं.

                                                                                                                                             --- वैभव.

Thursday, October 18, 2012

माज्या शाळेतली शिरोडकर...


आम्ही पण गेलो होतो शाळेत तर..
अन आमचीही एक शिरोडकर होती,
मंजे, तुमच्या शाळेतली जशी होती न
एकदम तितकीच ती बी सुंदर होती.. 

जोश्याची शिरोडकर म्हणून आलीस
अन थेट माझ्या हृदयात शिरलीस तू..
"तू काय करतोस हितं?" म्हणत म्हणत,
स्वतःबरोबर कुटंतरी घेऊन गेलीस तू.

च्यायला नरू मामा खरंच सांगायचा कि ते..
कुणालाबी नाई भ्यायचं, अगदी बिंदास राहायचं..
आपल्याच लाईन ला सुद्धा नाई कळेल कंदी..
अश्या कलेनं आपल्या लाईन कडे पाहायचं...

जोश्यासारखं मी हि तसंच सांगत होतो
कि "आपण नाई तसल्या भानगडीत पडत"..
पर आता असर असाकाही झालाय तुजा
का मनातून विचाराचं पाखरु बी नाई उडत.

पर एकदाची जेवापासून शाळा सुटली आपली..
पाटी फुटली आन सारंच वेगळं घडून राहिलं...
पर या मनाचं पाखरू मात्र सैरभैर आजही,
तुज्याच विचारासोबत मुक्त उडून राहिलं...

                                         -वैभव.

Friday, October 5, 2012

आज परत पाऊस कोसळून गेला...

आज परत पाऊस काही आठवून गेला..
अजूनही नितांत प्रेमात आहे मी तुझ्या,
परत तेच ते एक मनाला पटवून गेला.

झाडांची पानं चिंब न चिंब भिजवून गेला..
भिजवलेल्या हिरव्या गार झाडांसोबत,
साऱ्याच जुन्या गोष्टी मनात सजवून गेला.

रुसून असलेल्या कळ्यांना हसवून गेला..
आणि कसाबसा जरा बाहेर मी येत होतो,
तर परत तुझा चेहरा मनावर ठसवून गेला.

पाऊस आला, कोसळला आणि निघून गेला..
मी बसून होतो तसाच.. तिथेच झोक्यावर एकटा,
मला आतल्या आत भिजत असताना बघून गेला.

                                                    --वैभव.

Monday, October 1, 2012

म्हणजे ती कधीच...

आज अचानक माझ्या मनात एक विचार आला...
काय होईल जरा उद्याचा दिवसच निघणार नाही..
म्हणजे सूर्य लपून राहील अन रात्रच संपणार नाही.. 

म्हणजे ती कधी सकाळी खिडकीत दिसणार नाही..
ओले चिंब केस लांब सडक कधीच पुसणार नाही..
अन खाली नजर करून गालात हसणार ही नाही..

म्हणजे ती बसच्या लाईनीत येऊन वाट बघणार नाही..
समोरच्या टपरीवर तिचे डोळे मला शोधणार नाही..
अन माझ्या साठी स्वतःच्या दोन बस सोडणार नाही..

कॉलेज सुटल्यावर मोडीवर नजरा मिळणार नाही..
मला बघण्यासाठी अधून मधून मागे वळणार नाही..
आणि... आणि...
माझ्या मनाच्या भावना तिला कधीच कळणार नाही..

खरंच, काय होईल उद्या जर सूर्यच उगवणार नाही..
दिवस म्हणू की रात्र, ते मला कधीच बघवणार नाही..
कारण,
अश्या या दिनचर्येशिवाय तिच्या मी जगू शकणार नाही..

                                                          -वैभव.

Saturday, September 29, 2012

हितगुज... तिचं नि त्याचं...

ती एकदा म्हणाली मला,
की तू नक्कीच कुणावर तरी फार प्रेम करतोस..
नाहीतर एवढ्या कविता कश्या काय करतोस...
       मी म्हणालो,
       अग त्यासाठी प्रेम करावंच लागतं असं नाही..
       तर जणू मनातल्या भावनांना फक्त शब्द देणं जसं काही..

ती म्हणाली,
नाही काही, मनाला पटणारं असं कुणी भेटलं ना मनाला..
की तरच मुळी आपल्या मनामध्ये त्या भावना जागतात..
       मी म्हणालो,
       तसंच नाही गं,, पण आतंच जास्त गर्दी झाली ना कधी..
       तर त्या आपोआप अश्या शब्दांद्वारे बाहेर येऊ बघतात...

ती म्हणाली,
ठीक आहे, समज पटलंय मला तू जे काही म्हणतोयस..
पण मग तुझ्या प्रत्येक कवितेत 'ति'चाच उल्लेख का असतो?
       मी म्हणालो,
       अगं, आता त्या भावना आहेत "या वेड्या मनाच्या"..
       त्यांच्यावर माझा असा नेहमीच पुरेपूर ताबा नसतो..

ती गोड हसली, म्हणाली,
हा हा हा, तुझ्याच मनावर तूझाच ताबा नाही..
म्हणजेच इथे नक्कीच शिजतंय काही तरी..
       मी म्हणालो,
       बरं बाबा, तुला जे समजायचं आहे ते समज..
       पण खरंच, अजून मला प्रेयसी नाही खरी खुरी..

मी मग मनात म्हणालो, 
इला आता सांगू तरी कसा, की तूच माझी प्रेरणा खरी..
दुसरी तिसरी कुणीही नसून तूच आहेस माझी स्वप्नपरी..
       ती मनात म्हणाली..
       काय सांगू, मलाही मनापासून वाटत एखादे वेळेस कधीतरी..
       की मलाही कधी भेटावं असं, तुझ्यासारखच कुणी तरी..

                                                              -वैभव.

Monday, September 24, 2012

एकच होते हृदय मला...

कधीतरी एकदा असे काही घडले...                      
की मन हे माझे तुझ्यात जडले..
अन मी नकळत तुझ्या प्रेमात पडले..
प्रेमा पायी तुझ्या मी घरदार सोडले.. 
जीवन भर जपलेल्या नात्यांना तोडले..
साऱ्यांचे विश्वास काही क्षणात मोडले..

हृदयाच्या अश्रुंवर खोटे अंथरूण ओढले..
होते नव्हते मनात ते सर्व संशय काढले..
अन तू दिलेल्या वचनांच्या दारी चढले..

तू मात्र क्षणभरात सारेच काही मोडले...
असा वागलास जणू काही नाही घडले..
अन कुणा दुसरी साठी तू मला सोडले..

मग एक दिवस तू अचानक परत आलास.
म्हणालास "जुनं सारे काही विसरून जा..
परत एकदा माझ्या प्रेमात पडून पहा.."

मी तर परत तयार होऊन जाईल ही रे..
पण परत मन जडणार नाही त्याच काय..
कारण परत प्रेम करायला हृदय कुठाय..

एक संधी देण्यासाठी तू हातही जोडलेस..
पण एक गोष्ट तू पुरताच विसरून गेला..
एकच होते हृदय मला.. ते तूच तर तोडलेस..

                                            -वैभव.

Monday, September 17, 2012

मलाही एकदा खऱ्याखुऱ्या प्रेमात पडायचंय तुझ्या...


वर वर सांगत असतो मी सर्वांना नेहमी की,
मी नाही आहे प्रेमाच्या वैगेरे फंदात ते बरंय..
पण खरं सांगू का गं तुला, असं वाटतं कधी की,
मलाही एकदा ना खऱ्याखुऱ्या प्रेमात पडायचंय.

जे सारं काही कवितांमध्ये लिहित आलोय ना 
ते सारं नेहमी प्रत्यक्षात तुजसाठी करायचंय.
स्वप्नाबाहेर एकदा खऱ्या प्रेमात पडून तुझ्या
त्या सुंदर कल्पनेचा मला अनुभव घ्यायचाय.

स्वप्नात तर रोजच पडतो मी तुझ्या प्रेमात,
एकदा बाहेरही ये ना गं खरीखुरी कधीतरी..
तुझ्यावरच लिहिलेल्या त्या कविता वाचून
तुझ्याबद्दल विचारतात माझे मित्र कितीतरी.

कधी कधी ना देवावरही मला राग येतो थोडा,
सगळीकडे प्रेमाचा फार आरडा ओरडा असतो..
जणू देवाने वर्षावच लावलाय प्रेमाचा इथे तर..
पण या वर्षावात मीच एक फक्त कोरडा असतो..

साक्ष आहे खऱ्या प्रेमाची, खरंच सांगतो मी,
रोज सकाळी देवाजवळ तुलाच मागतो मी..
स्वप्नात येतेस तर असं नाही की झोपलोय
तर तुझ्याच विचारात दिवसरात्र जागतो मी..

                                               - वैभव.

Saturday, September 8, 2012

पण जेव्हा तू अशी...


तू जेव्हा अशी नजरे आड असतेस ना...
जीवन ना, फार सुनं सुनं वाटतं,
ताजं एखादं फूल सुद्धा जुनं जुनं वाटतं.

          पण जेव्हा तू माझ्या जवळ बसतेस ना...
          सारं जग कसं अगदी नकोसं वाटतं,
          अन त्या क्षणाने तिथंच थांबावसं वाटतं. 


तू जेव्हा कधी अशी रुसून बसतेस ना...
माझंच मन मला खायला धावतं,
अन वेड्या वाकड्या कसरती करायला लावतं.

          पण मग जेव्हा तू छान लाजून हसतेस ना...
          त्या कसरतींच पण मनाला वेड लागतं,
          अन मन तुला तसंच हसताना बघायला लावतं.


तू जेव्हा कधी अशी जवळ नसतेस ना...
आयुष्य कुठेतरी अपूर्ण वाटतं,
जणू मनावर कसलंतरी मोठं ऋण वाटतं.

          पण जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना...
          ते ऋणही मला फार हिनं वाटतं,
          अन माझं अर्धवट आयुष्य ते पूर्ण वाटतं.


                                                    -वैभव.

Thursday, September 6, 2012

असं कधीच वाटलं नव्हतं...

 कधी तरी असं पण घडेल
असं कधीच वाटलं नव्हतं.
मन कधी कुणासाठी एवढे झुरेल
असं कुणीच मनाला पटलं नव्हतं.

अशीही कधी अवस्था होईल
असं कधीच वाटलं नव्हतं.
डोळे बरेचदा पाणावले होते पण
हृदयात कधी पाणी साठलं नव्हतं.

कधी एकदा असाही प्रसंग येईल
असं कधीच वाटलं नव्हतं.
लाखोंच्या विरोधातही हात घट्ट पकडून ठेवणार
असं कुणीच आजवर भेटलं नव्हतं.

मी ही प्रेमात पडेल कधी कुणाच्या
असं कधीच वाटलं नव्हतं.
कारण इतक्या प्रेमाने स्वतःच्या कुशीत
कधीच, कुणीच गाठलं नव्हतं.

कारण "प्रेम करतो" असे बरेच म्हणाले होते
पण कधीच, काहीच वाटलं नव्हतं.
पण थेट मनाची साद येईल इतक्या आपुलकीने
कधीच, कुणीच म्हटलं नव्हतं.

--वैभव

Monday, September 3, 2012

त्याने काही फरक पडत नाही..

तू हो म्हण किंवा नाही म्हण, त्याने काही फरक पडत नाही..
माझ्या मनाच्या तारा नेहमीच तुझ्या मनाशी जुळत राहील.

          बऱ्याच आठवणी दिल्या आहेस जपून ठेवण्यासाठी तू मला
          त्या आठवणींची पाने अजूनही हे मन तसंच चाळत राहील.

तू सोबत ये किंवा नको येऊ, त्याने काही फरक पडत नाही..
हे मन मात्र तुझ्या आठवणीच्या पायवाटेनुसार वळत राहील.

          असं वेड लागलाय तुझं मला की नसशील तू या जगात जरी
          तरी माझं हृदय नेहमीच तुझ्या हृदयामागे तसंच पळत राहील.

तू दखल घे की नको घेउस, त्याने काही फरक पडत नाही.
मी मात्र असाच या हसऱ्या चेहऱ्यामागे अश्रू गाळत राहील.

          परतण्याचे वचन दे नको देऊ, त्याने काही फरक पडत नाही.
          मी मात्र तुझ्या प्रतीक्षेत नेहमीच दिव्यासारखा जळत राहील.


-- वैभव.

Tuesday, July 31, 2012

वेडी मने....

त्याचं वेडं मन...

खरं सांगायचं झालं तर
मी तुला आधीच बोलणार होतो.
गुपित या बालिश हृदयाचे
खूप आधीच खोलणार होतो.

खरं सांगायचं झालं तर
आवडली होतीस पहिल्यापासूनच
हृदयही शरण गेले तुला
पहिल्यांदा तुला पाहिल्यापासूनच.

खरं सांगायचं झालं तर
आता मनात ठेऊन राहवत नाही
तुला कुणा दुसऱ्याशी
नुसतं बोलतानाही पाहवत नाही

खरं सांगायचं झालं तर
तुझ्या प्रीती मुळे घडायला लागलोय,
कालच्याहून आज जास्त असा
रोज तुझ्या प्रेमात पडायला लागलोय.

खरं सांगायचं झालं तर
भीती वाटतेय थोडी, तू रागावशील..
पण राहवत नाही म्हणून विचारतोय,
पुढलं जीवन माझ्यासोबत घालवशील?

तीचं वेडं मन...

खरं सांगायचं झालं तर
मला नेहमीच असं वाटायचं.
जेव्हाही बघायचा तू मला
तुला काही तरी आहे बोलायचं.

खरं सांगायचं झालं तर
पहिल्यांदा तुझ्या डोळ्यात एक भाव दिसला.
बरेच जण होते कॉलेजमध्ये
मात्र तूच एक थेट हृदयात जाऊन बसलास.

खरं सांगायचं झालं तर
तू बोलावस म्हणून मी बोलते अनेकांशी
पण तुला मात्र कधी एक
शब्दही सुचत नाही बोलायला माझ्याशी.

खरं सांगायचं झालं तर
वाटत असं मला की कधी असं घडावं
न सांगता मला एकेदिवशी
तू माझ्या गुपचूप असं प्रेमात पडावं.

खरं सांगायचं झालं तर
धीर नाही मला पण मी कशी सांगणार?
मलाही तुझ्यावर प्रेम आहे.
तूच विचार ना कधी.. मी नाही नाही म्हणणार.

                                                -वैभव

Monday, July 30, 2012

फरक फक्त एवढाच आहे ...

फरक फक्त एवढाच आहे त्याच्यात आणि या जगात,
जग विरुद्ध असेल माझ्या तर तो उभा असतोच माझ्या पाठीशी ताठ.


फरक फक्त एवढाच आहे त्याच्यामध्ये आणि बाकी जणांमध्ये,
कुणीच समजलं नाही मला तरी त्याचे मन नक्की समजून घेईल एवढ्या मनांमध्ये.

फरक फक्त एवढाच आहे त्याच्यामध्ये आणि बाकी मध्ये
कितीही भांडलो आम्ही तरी अर्धा वाटा नक्कीच ठेवेल तो माझा maggi मध्ये.

फरक फक्त एवढाच आहे त्याच्या मध्ये आणि घरच्यांमध्ये
सारेच रागावले माझ्यावर तरी फक्त तोच येतो समजूत काढायला एकट्यामध्ये.

एकच इच्छा आहे की जीवन भर असाच राहावा साथ तुझा,
फरक एवढाच आहे की जगासारखा असूनही जगाहून वेगळा आहे दादा माझा.


                                                                              -- वैभव 

Saturday, July 21, 2012

तुला आता कदाचित काही आठवत नसेल...

तुला आता कदाचित काही आठवत नसेल
आठवले तरी काही फरक पडत नसेल...
बरीच दिवस झालेत आयुष्यातून गेलीस निघून ते
त्यामुळे तुला आता काही जाणवत ही नसेल...

ती बाग मात्र आजही तेवढीच हिरवी असेल
त्या बागेतला तो बाक ही तसाच तिथेच असेल
त्या बाकावर बसून तू कविता करायचीस माझ्या हातावर
पण तुला मात्र आता काही सुचतही नसेल..

ते झाड मात्र आजही आपली आठवण काढत असेल
ती कोकीळ आजही तेच गाणं गात असेल...
तिच्या गाण्याच्या तालात सूर मिळवायचीस तू
पण आता मात्र तुझा सूरही जुळत नसेल...

तो पहिला पाऊस आजही तसाच बरसत असेल
त्या पायवाटा आजही तश्याच भिजत असेल...
त्याच वाटांवरून माझा हात धरून चालायचीस तू
पण आज मात्र तुझा हात रिकामाच असेल..

बरीच दिवस झालेत आयुष्यातून गेलीस निघून ते
त्यामुळे तुला आता काही जाणवत ही नसेल...
बाहेरचा पाऊस अंगावर घेऊनही तू  कोरडीच राहत असेल
आत मात्र अश्रू बरसवून तुझ मन भिजून जात असेल...

                                                        -वैभव 

Friday, July 20, 2012

सच है कहते लोग शायद देर अंधेर के बारे मे..

सच है कहते लोग शायद देर अंधेर के बारे मे..
भगवान किसीको नही रखता गम के दायरे मे...

मैने तो मांगा था एक सच्चा प्यार नसीब मे...
कहा पता था के कई जादा था मेरी लकीर मे...

अपने खजाने के चुनिंदा मोहरो मे से तुझे खोज लिया..
और मेरी मुराद पुरी करने के लिये तेरे जैसा दोस्त दिया..

तेरी दोस्ती ने न की सिर्फ प्यार करना दिखा दिया...
बल्की प्यार से भी बढकर जिंदगी जीना सिखा दिया...

अच्छा है के इन्सान किमत के साथ नही आता...
वरना तेरे जैसा दोस्त मै कभी खरीद ही न पाता...

तेरे आने से पहले मेरी ये जिंदगी बडी थी बेरंग...
अब रात के अंधेरे मे भी दिखे सुरज की किरण...

सच ही कहते लोग शायद देर अंधेर के बारे मे..
जिंदगी बदल जाती है ऐसे दोस्तो के सहारे मे...

-वैभव 

Sunday, July 8, 2012

"प्रेमात पडलोय मी तुझ्या.. म्हणूनच कदाचित."


काही दिवसांपासून ना फार वेगळ घडतंय,
जणू काही सगळच काल्पनिक एकत्रित..
तुला बघतो ना रोज.. म्हणूनच कदाचित.

आजकाल कुणाचा रागही नाही येत मला,
सहसा ओठांवर असतं एक गोड असं स्मित..
तुझा विचार करतो ना.. म्हणूनच कदाचित.

अवतीभवतीच हे सारं जगच बदललंय जणू,
जसा स्वप्नांच्या जगात शिरलोय आकस्मित..
हसून तू पाहिलेस काल.. म्हणूनच कदाचित.

जगण्यात आता वेगळीच मजा येतेय मला,
वाटतंय की सारी परिघं वाढलीये एक एक वीत..
तुझा सहवास मिळाला ना.. म्हणूनच कदाचित.

आपले मैत्रीचे नाते आता इथेच संपवूया आपण,
असं वाटतंय की काही नाही ठेवलाय या मैत्रीत..
कारण...
"प्रेमात पडलोय मी तुझ्या.. म्हणूनच कदाचित."

                                                --वैभव 

Saturday, July 7, 2012

हे आयुष्याचं गणित...

आयुष्याच हे गणित फारच विचित्र आहे
अजून पर्यंत कुणाला उलगड्लेलच नाही,
सुटता सुटेना कुणास काही केल्या जमेना
पण वाटतंय की अजून काही बिघडलेलच नाही.

बघता बघता अख्खं आयुष्य निघून जातं
रुपये पैश्याच्या या बेरीज अन वजाबाकीत,
कमवता कमवता पूर्ण आयुष्य शेवटला येतं
अन मोलाचे क्षण मात्र राहून जातात थकीत.

सुखाचा गुणाकार अन दुःखाचा भागाकार
सतत चालू राहतात डोक्यात असले प्रश्न,
जे जवळ आहे त्यात कधी समाधान नाही
म्हणून लोन च्या नावावर घेतो सुखं उसण.

आधी नौकरी मग लग्न मग गाडी मग बंगला
असा मुलभूत गरजांचा करत असतो कंचेभागुबेव
एक एक करत मुलभूत गरजा भागल्या गेल्या
तरी तू मात्र या लोभापायी हा हव्यास चालू ठेव.

जीवनातलं ध्येय अगदी "एक्स" सारखं झालंय.
कितीही माळे बांधून बसलो टाकून खुर्ची टेबल
अन जरी कितीही पैसे, कितीही यश कमावले
तरीही मात्र "एक्स इज अन अननोन वेरीएबल".

खरंच फारच विचित्र आहे हे आयुष्याचं गणित.
कधीही कुणाला पूर्णपणे उलगडलेल नाही अजून.
जीवन संपूनही जाईल आणि जवळ येईल मरण
तरीही असच अर्धवट राहील हे मोठ्ठ समीकरण.

                                                 -- वैभव

Wednesday, June 27, 2012

तर आज आमचाही एखाद अफेयर असतं.

आजकाल जरा जास्तच वाटाले लागल मले
आठवून राहिले राहून राहून दिवस कालेजातले
त्यावेळी जर आमी नं केल थोडं फार डेयर असतं
तर साला आज आमचाही एखाद अफेयर असतं.

आवडली होती मले बी एक पोरगी कालेजामंदी
अन तिकडून ही येत होता रीस्पोंस इशाऱ्या मंदी
पर तेवा जर का अभ्यासच केलं येवढ केयर नसतं
तर साला आज आमचाही एखाद अफेयर असतं.

वाचून फेसबुक वर रिलेशनशिप स्टेटस वरचेवर
आमच्याही मनात करते सतत एक गोष्ट घर
सालं आमचंही नशीब जरासं का फेयर असतं
तर साला आज आमचाही एखाद अफेयर असतं.

कारा डोम्ड्या पोरासोबत गोरी चिट्टी पोरगी पाहून
आतल्या आत घेते आंग अख्खं काळीज खाऊन.
आमच्याही खिश्यात जर का पैश्याचं लेयर असतं
तर साला आज आमचंही एखादं अफेयर असतं.

पोरगी भेटली म्हणून एवढा कायचा रुबाब लेकहो
आमी न सोडली म्हणूनच तुमाले थे पटली राजेहो.
कारण आदी आमी न जर नशीब ट्राय केल असतं
तर सालं आज आमचाही एखाद अफेयर असतं.

तसं नेहमीच काई असं वाटत नाही आमाले पर
आज वाटलं का असती एखादी आपली बी तर
म्हणून म्हणतो का आमी केल थोडं डेयर असतं
तर साला आज आमचाही एखाद अफेयर असतं.

-वैभव

Tuesday, June 19, 2012

"प्रीती तुझी नि माझी"


तू सोबत आहेस माझ्या
तर मला नाही परवा या जगाची
जग  माझे तुज्यात आहे
मी कशाला धरू भीती कुणाची.

                        जे काही आहे आत्ता आहे
                        कशाला करू मी चिंता उद्याची
                        सोबत तुझ्या जगण्यासाठी
                        पुरेल मला साथ तुझ्या हृदयाची.

सहजासहजी नाही तुटणार
जरी असली गाठ कच्च्या धाग्याची.
एक नाही किंवा दोन नाही
तर शपथ आहे ही साता जन्मांची

                         एक दिवस नक्की उजाडेल
                         जेव्हा डोळे उघडतील या जगाची,
                         आणि तेव्हा त्यांना कळेल
                         काय आहे ही "प्रीती तुझी नि माझी".

तोवर असाच सोबत रहा
तर मला नाही परवा या जगाची.
आयुष्यभर असेच राहूत
जणू देहात एका आत्मा दोघांची.
                                                 -वैभव.









Saturday, June 16, 2012

माझिया प्रियाला प्रीत कळेना.

आजकाल माझ असं का होतंय काही कळेना,
शरीर जागी असलं तरी चित्त जागी असेना.

काही करावे तरी मन हे माझ कुठेच लागेना
देह बोलतो एक तरी मन त्यासारखे वागेना.

कोटी प्रयत्न केला तरी मन तुझ्यातून वळेना
पाखरू तुज्या विचारांचे हृदयातून या उडेना.

कितीही जुळवले शब्द तरी तुजवीन ते जुळेना
पण  माझिया प्रियाला मात्र प्रीत ही कळेना.

--  वैभव 

Thursday, May 31, 2012

जिंदगी मे बस एक सच्चे दोस्त की कमी रह गई.

एक ख्वाहिश थी दिल में अब जो बस थमी रह गई,
जिंदगी मे बस एक सच्चे दोस्त की कमी रह गई.

काटा है जिंदगी का सफर मैने दिये के तरह जलते हुये,
ना करी कभी खुद की परवाह उन गैरो के संग चलते हुये.

चलते चलते राह मे गैरो को तो हमने अपना बना लिया,
पर बेगैरत बन बैठे सब जो हमे वक़्त के साथ भुला दिया.

बस यही उम्मीद थी के हमे भी कोई साथ मिल जाए,
कभी ख़ुशी कभी गम मे थाम ले ऐसा हाथ मिल जाए.

पर उम्मीद जो थी दिल मे वो वैसे ही जमीं रह गई,
चंद बाते थी करनी बयान जो होठो पे जमी रह गई.

एक ख्वाहिश थी दिल में अब जो बस थमी रह गई,
जिंदगी मे बस एक सच्चे दोस्त की कमी रह गई.

                                                   - वैभव

Tuesday, May 29, 2012

तुझी ती अदा ...

तुझी ती अदा आणि तुझी ती नजर,
अन घायाळ करणे ते माझे जिगर...

ती मादकता अन ती नाजूकता,
थेट काळजात वार करणे न चुकता...

रक्तवर्ण कपड्यात तू दिसतेस अशी,
बागेत गुलाबाची कळी लाजते जशी...


गाऊ तरी किती तुझ्या रूपाचे गुणगान,
बस्स, पाहताच होई विश्वामित्रही बेभान...

मी तर मग आहेच मनुष्य साधा,
म्हणूनच तर झालोय, दिवाना तुझा.


- वैभव 

जुळतील का कधी या दोन मनांच्या तारा?

प्रेम तसा तुझ्यावर मी करतो तर खरा
पण सांगायला तुला मी घाबरतो जरा.
शब्द न शब्द जपून ठेवलाय मी मनाशी
पण बोलवत नाहीच कधी ओठां द्वारा.

भावना फक्त वाहतात, जश्या पावसाच्या सरा.
शब्द मात्र साचून राहतात, जश्या राहतात गारा. 
धाडस केले जरी कधी सारं सांगण्याचे तुला
तरी पाहताच तुला विसर पडतो जगाचा सारा.

मला आधी वाटायचे की मी एकटाच होतो बरा.
पण कळाले नंतर की भ्रम होता तो माझा जरा.
कारण जेव्हापासून आलीस तू स्वप्नात माझ्या
तेव्हा कळू लागलाय मला जगण्याचा अर्थ खरा.

मला नाहीच वाटत मी कधी सांगू शकेल तुला,
तू कधीतरी घेणा जाणून काय आहे माझ्या मना.
खरंच, तसा तर फार प्रेम करतो मी तुझ्यावर खरा.
सांग ना, जुळतील का कधी या दोन मनांच्या तारा??


- वैभव

Sunday, January 29, 2012

होशील का माझी राणी ?


एकटाच हे जीवन मी जगत आलोय...
दुसऱ्यांसाठी दिव्यासारखा धगत आलोय...
चंद्राला ताऱ्याची अन पावसाला साथ वाऱ्याची,
घडत असताना जन्मोजन्मी मी बघत आलोय....

एकाकीपणाची जाणीव आता होऊ लागलीये...
तू नाहीस सोबत याचा खंत होऊ लागलाये...
पाहिलीये वाट आजवर तुझ्या येण्याची पण...
मनाच्या सहन्शिलातेचाही अंत होऊ लागलाये...

मलाही कुणीतरी हवंय आता साथीला...
सदा तेलाची साथ असते जशी वातीला...
सुखदुःखाच्या वाटेवर चालावे सोबत कुणी,
म्हणून एक हात हवाय आता हातीला...

नाहीच आली तू तर मरण तर येणार नाही...
पण एकटा या जगात जगुनही जगणार नाही...
किती प्रेम आहे तुझ्यावर बघ तर विचारून एकदा,
कळाल्यावर तुला तुही विसरू शकणार नाही.

वाटत असेल तुला की छंद आहे मला तुझा...
पण नाद नाही तर नड आहे तू माझी आणि...
चंद्राच्या साक्षीने चांदण्यासारखा जपीन तुला,
एकदाची मला सांग "होशील का माझी राणी ?"


-- वैभव